प्रतिनिधी | बीड
बीड जिल्ह्यातील केज तहसीलसमोर सरकार आणि प्रशासनाच्या निर्दयी बेफिकिरीचा थरकाप उडवणारा स्फोट झाला आहे! एका शेतकरी महिलेचा आंदोलनादरम्यान जागीच मृत्यू झाला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड थेट म्हणाले – “ही आत्महत्या नाही, हा सरकारनं घडवलेला राजकीय खून आहे!”
‘आवादा’ म्हणजे काय? शेतकऱ्यांची छळयंत्रणा?
अवादा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातून जबरदस्तीने वीज वायर ओढल्या. शेतकरी विरोध करत असतानाही कंपनीने पोलिस आणि प्रशासनाच्या आधारे दबाव टाकत काम पुढे चालू ठेवले.
या सगळ्या गुन्ह्यांना संरक्षण देणारी ही यंत्रणाच या महिलेच्या मृत्यूला जबाबदार नाही का?
मरणानंतरही न्याय नाही – संतप्त शेतकरी आक्रमक!
मृत शेतकरी महिलेच्या नातेवाईकांनी आणि आंदोलकांनी तिचा मृतदेह थेट तहसील कार्यालयासमोर आणत आक्रमक पवित्रा घेतला –
“जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार नाही!”
ही केवळ मागणी नाही, ही व्यवस्थेला दिलेली इशारा आहे!
जितेंद्र आव्हाडांची संतप्त गर्जना
“कंत्राटदार हर्षल पाटीलनंतर आता ही शेतकरी महिला… हा अपघात नाही, आत्महत्या नाही, हा ‘राजकीय खूनच’ आहे.
सरकार, प्रशासन आणि अवादा कंपनी – तिघंही या हत्येचे जबाबदार आहेत!”
आव्हाड पुढे म्हणतात,
“मृत महिलेला तहसीलदारानं उत्तर दिलं – ‘हे आमच्या अखत्यारीत नाही!’
मग कुणाच्या अखत्यारीत आहे हा शेतकऱ्यांचा जीव?”
ही तर सुरुवात आहे!
बीड जिल्ह्यात अवादा कंपनीच्या कारभाराने आधीही संतोष देशमुख यांचा जीव घेतला.
आता आणखी एका बळीची नोंद झाली. पण तरीही सत्ताधारी गप्प?
शेतकऱ्यांच्या हक्कांवर चाललेला हा सरकारी आक्रमण आहे.
हा मृत्यू नाही – ही व्यवस्थेवर ओरडून सांगणारी ‘क्रांतीची घंटा’ आहे!